.
राजकारण्याना शिव्या देण ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे.
राजकारणी स्वार्थी असतात मान्य आहे, पण ते मुर्ख नक्कीच नसतात.
आणि ते येतात कुठून??? आपल्यातुनच ना? मग त्यांच्या नावाने बोंबलण्यात काय अर्थ आहे ?
राजकारणातील घराणेशाही हा पण फसवा शब्द आहे. घराणेशाही कुठे नसते???
मग त्यांच्या नावाने रडण्यात काय अर्थ आहे??
अहो, पीठाची गिरणी चालवणारा माणूस पण आपली गिरणी आपल्यानंतर आपल्या मुलाकडेच सोपावतो, मग राजकीय वारसा कुणी तरी दुस-याला देइल काय???
तुमच्या घरातलं कुणी राजकारणात काही करू शकलं नाही, ही 'बिचा-या' युवा नेत्यांची चुक असू शकत नाही.
तुमचे वडील, काका, मामा जर राजकारणी असते, तर तुमचे हे मत असले असते का???
जे लोक मुंबई मध्ये दोन-तीनशे लोकांचे बळी गेल्या नंतर सुद्धा मतदानाला बाहेर पडत नाहीत, त्यांच्यासाठी नियतीने असंच मरण लिहिलेलं आहे.
लक्षात ठेवा, गेले ते जात्यात होते, तुम्ही सुपात आहात ..
असंच मरा लेको, तीच तुमची लायकी आहे !!!
.
No comments:
Post a Comment