28 October, 2009

असंच मरा लेको..

.

राजकारण्याना शिव्या देण ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे.

राजकारणी स्वार्थी असतात मान्य आहे, पण ते मुर्ख नक्कीच नसतात.

आणि ते येतात कुठून??? आपल्यातुनच ना? मग त्यांच्या नावाने बोंबलण्यात काय अर्थ आहे ?

राजकारणातील घराणेशाही हा पण फसवा शब्द आहे. घराणेशाही कुठे नसते???

मग त्यांच्या नावाने रडण्यात काय अर्थ आहे??

अहो, पीठाची गिरणी चालवणारा माणूस पण आपली गिरणी आपल्यानंतर आपल्या मुलाकडेच सोपावतो, मग राजकीय वारसा कुणी तरी दुस-याला देइल काय???

तुमच्या घरातलं कुणी राजकारणात काही करू शकलं नाही, ही 'बिचा-या' युवा नेत्यांची चुक असू शकत नाही.

तुमचे वडील, काका, मामा जर राजकारणी असते, तर तुमचे हे मत असले असते का???

जे लोक मुंबई मध्ये दोन-तीनशे लोकांचे बळी गेल्या नंतर सुद्धा मतदानाला बाहेर पडत नाहीत, त्यांच्यासाठी नियतीने असंच मरण लिहिलेलं आहे.

लक्षात ठेवा, गेले ते जात्यात होते, तुम्ही सुपात आहात ..


असंच मरा लेको, तीच तुमची लायकी आहे !!!

.

27 October, 2009

साहेब, काय केलत हे???

.

कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे चक्क लहान मुलानी भाषण पाठ केल्यासारखे बोलले.
प्रश्न काय, उत्तर काय, कशाचा ही कशाला संबंध नाय !!!

"गरज पडल्यास हिंदुत्व" ही नवी व्याख्या, नवी कल्पना भारतीय राजकारणात काल त्यानी आणली।
आणि शिवसेनेचा पराभव झाला नाही म्हणने तर बालिशपणाचे नाही तर वेडगळपणाचे आहे.
"एक ही आमदार निवडून न येण" अशी कदाचित त्यांची पराभवाची कल्पना असेल !!

मराठी माणूस आज पण शिवसेनेच्याच पाठीशी आहे,
कारण शिवसेना ही मराठी मनाची भावनिक गरज आहे..
राज ठाकरे चालवतात ती शिवसेना आहे, मग त्यांच्या पक्षाचं नाव काहीही असो...
राज आज दोन आकड्यात खेळत आहेत, २०१४ ला तीन आकड्यात खेळणार हे नक्की...

मुळात उद्धव ची काहीच चुक नाही, त्यांच्यात पात्रताच नाही तर ते तरी बिचारे काय करणार??? !!!

महाराष्ट्राचे दुर्दैव, दुसरे काय !!! महाराष्ट्रपुरुष ढसढसा रडत असेल आज!!!

खंत फक्त एवढीच आहे, की शेवटच्या काळात बाळासाहेबाना हे दिवस बघावे लागले...
विधानसभेवर भगवा फडकल्यानंतर साहेब दाढी काढणार होते...

.

काळजातली जखम..

.

काळजातली जखम, अशी कधी कधी भळभळायला लागते..


आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ लावण्याचा प्रयत्न कधी केला आहेस का तु ???


आपलं दुर्दैव हे, की आपल्याला... आपल्या राष्ट्रगीताचा अर्थच कधी शिकवला जात नाही॥


इंग्रजांचा राजा पंचम जोर्जच्या स्वागतासाठी लिहिलेल्या गाण्यातलं पहिलं कडवं आपण चक्क राष्ट्रगीत म्हणुन स्वीकारलं आहे॥


आता बघ कसा पटापट अर्थ लागतो !!!


"जन-गनाच्या मनाचा अधिनायक असलेल्या हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा)


तुझा जयजयकार असो !!!


पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रावीड, उत्कल, वंग (हे प्रदेश आणि )


विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा आणि उसळणारे सागर


( थोडक्यात जमीन, पर्वत, नद्या, सागर सर्व )


तव शुभ नामे गाहे, आणि तव शुभ आशिष मागे !!!


आणि वर गाहे तव जय गाथा !!!!


जन-गणासाठी मंगलदायका, हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा) जय हे॥ ( तुझा जयजयकार असो !!!)


जय हे, जय हे, जय हे... ( त्रिवार जयजयकार) जय जय जय जय हे !!!!!!( असंख्य वेळा जयजयकार असो !!!)



भारतात आजही करोडो मुले इंग्रजांचा तेंव्हाचा राजा पंचम जोर्जचा दररोज जयजयकार करतात...



अज्ञानात आनंद !!! दुसरं काय म्हणनार ??



आता कसं वाटतय ???



---------------------------------------------------------------------