11 September, 2010

... तर मी ही गीता सांगेन !

'
सव्वाशे वर्ष जगलो,
तर मी ही गीता सांगेन ,
पोरींकडे नका बघू म्हणत
सोबत दारुबंदीही सुचवेन..


काम-क्रोध, मोह-माया ,
अडवतात म्हणे स्वर्गाची वाट..
तुला तरी आवडेल का सांग
बिन मसाल्याच्या जेवणाचा थाट ??

साध-सरळ 'विकारी'
आयुष्य मला जगु दे
मरायच्या आधीच नको मारू,
मरेपर्यंत जगु दे


तोपर्यंत मात्र देवा ,
एक Request आहे... Please
आत्म्याच्या उन्नतीबद्दल
एक शब्दही नको बोलू...PLEASE !!


वचन देतो देवा तुला,
मरताना नक्की चांगला वागेन
सव्वाशे वर्ष जगलोच ,

तर... मीही गीता सांगेन !!!!



- डॉ. रविराज कुलकर्णी


.

10 September, 2010

श्री राज ठाकरे यांसी ,

'
श्री राज ठाकरे यांसी,


मी काँग्रेसी नाही,

म्हणून माझा तुम्हाला साष्टांग दंडवत नाही,




शिवसैनिक नाही म्हणून जय महाराष्ट्र नाही,

वैदर्भीय नाही म्हणून जय विदर्भ नाही,

भाजपाई नाही म्हणून जय श्रीराम नाही,

आणि भीमसैनिक नाही, म्हणून जय भीम पण नाही.




ब्राह्मण नाही, म्हणून जय परशुराम नाही

मराठा नाही, म्हणून जय जिजाऊ नाही

धनगर नाही, म्हणून जय मल्हार नाही,

माळी नाही, म्हणून जय सावता नाही

वंजारी नाही, म्हणून जय भगवान नाही

कोळी नाही, म्हणून जय वाल्मिकी नाही

चांभार नाही, म्हणून जय रोहिदास नाही

न्हावी नाही, म्हणून जय जीवा नाही,

लिंगायत नाही, म्हणून जय शिवा नाही

मुस्लिम नाही, म्हणून सलाम आलेकुम नाही


आणि नक्षलवादी नाही, म्हणून लाल सलाम पण नाही..




लहानपणी, मराठीच्या गुरूजींनी

पत्रलेखनाच्या मायन्यात शिकवलं होतं,

तेच लिहितोय,



सप्रेम नमस्कार.




पत्रास कारण की,


मला फक्त एवढंच विचारायचं होतं, की

वरीलपैकी कुणासाठी करताय एवढं सगळं??





त्यांच्यातला एक जण पण,


फक्त मराठी नाहीय!!!!!


- डॉ. रविराज कुलकर्णी


.

04 January, 2010


28 October, 2009

असंच मरा लेको..

.

राजकारण्याना शिव्या देण ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे.

राजकारणी स्वार्थी असतात मान्य आहे, पण ते मुर्ख नक्कीच नसतात.

आणि ते येतात कुठून??? आपल्यातुनच ना? मग त्यांच्या नावाने बोंबलण्यात काय अर्थ आहे ?

राजकारणातील घराणेशाही हा पण फसवा शब्द आहे. घराणेशाही कुठे नसते???

मग त्यांच्या नावाने रडण्यात काय अर्थ आहे??

अहो, पीठाची गिरणी चालवणारा माणूस पण आपली गिरणी आपल्यानंतर आपल्या मुलाकडेच सोपावतो, मग राजकीय वारसा कुणी तरी दुस-याला देइल काय???

तुमच्या घरातलं कुणी राजकारणात काही करू शकलं नाही, ही 'बिचा-या' युवा नेत्यांची चुक असू शकत नाही.

तुमचे वडील, काका, मामा जर राजकारणी असते, तर तुमचे हे मत असले असते का???

जे लोक मुंबई मध्ये दोन-तीनशे लोकांचे बळी गेल्या नंतर सुद्धा मतदानाला बाहेर पडत नाहीत, त्यांच्यासाठी नियतीने असंच मरण लिहिलेलं आहे.

लक्षात ठेवा, गेले ते जात्यात होते, तुम्ही सुपात आहात ..


असंच मरा लेको, तीच तुमची लायकी आहे !!!

.

27 October, 2009

साहेब, काय केलत हे???

.

कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे चक्क लहान मुलानी भाषण पाठ केल्यासारखे बोलले.
प्रश्न काय, उत्तर काय, कशाचा ही कशाला संबंध नाय !!!

"गरज पडल्यास हिंदुत्व" ही नवी व्याख्या, नवी कल्पना भारतीय राजकारणात काल त्यानी आणली।
आणि शिवसेनेचा पराभव झाला नाही म्हणने तर बालिशपणाचे नाही तर वेडगळपणाचे आहे.
"एक ही आमदार निवडून न येण" अशी कदाचित त्यांची पराभवाची कल्पना असेल !!

मराठी माणूस आज पण शिवसेनेच्याच पाठीशी आहे,
कारण शिवसेना ही मराठी मनाची भावनिक गरज आहे..
राज ठाकरे चालवतात ती शिवसेना आहे, मग त्यांच्या पक्षाचं नाव काहीही असो...
राज आज दोन आकड्यात खेळत आहेत, २०१४ ला तीन आकड्यात खेळणार हे नक्की...

मुळात उद्धव ची काहीच चुक नाही, त्यांच्यात पात्रताच नाही तर ते तरी बिचारे काय करणार??? !!!

महाराष्ट्राचे दुर्दैव, दुसरे काय !!! महाराष्ट्रपुरुष ढसढसा रडत असेल आज!!!

खंत फक्त एवढीच आहे, की शेवटच्या काळात बाळासाहेबाना हे दिवस बघावे लागले...
विधानसभेवर भगवा फडकल्यानंतर साहेब दाढी काढणार होते...

.

काळजातली जखम..

.

काळजातली जखम, अशी कधी कधी भळभळायला लागते..


आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ लावण्याचा प्रयत्न कधी केला आहेस का तु ???


आपलं दुर्दैव हे, की आपल्याला... आपल्या राष्ट्रगीताचा अर्थच कधी शिकवला जात नाही॥


इंग्रजांचा राजा पंचम जोर्जच्या स्वागतासाठी लिहिलेल्या गाण्यातलं पहिलं कडवं आपण चक्क राष्ट्रगीत म्हणुन स्वीकारलं आहे॥


आता बघ कसा पटापट अर्थ लागतो !!!


"जन-गनाच्या मनाचा अधिनायक असलेल्या हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा)


तुझा जयजयकार असो !!!


पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रावीड, उत्कल, वंग (हे प्रदेश आणि )


विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा आणि उसळणारे सागर


( थोडक्यात जमीन, पर्वत, नद्या, सागर सर्व )


तव शुभ नामे गाहे, आणि तव शुभ आशिष मागे !!!


आणि वर गाहे तव जय गाथा !!!!


जन-गणासाठी मंगलदायका, हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा) जय हे॥ ( तुझा जयजयकार असो !!!)


जय हे, जय हे, जय हे... ( त्रिवार जयजयकार) जय जय जय जय हे !!!!!!( असंख्य वेळा जयजयकार असो !!!)



भारतात आजही करोडो मुले इंग्रजांचा तेंव्हाचा राजा पंचम जोर्जचा दररोज जयजयकार करतात...



अज्ञानात आनंद !!! दुसरं काय म्हणनार ??



आता कसं वाटतय ???



---------------------------------------------------------------------



22 August, 2009

गीतारहस्याच्या यशापयशाचे रहस्य


जीवनात नैराश्याचे ढग जमू लागले असताना टिळकांनी गीतारहस्य लिहिलं ते पेन्शनरांसाठी नव्हे तर तरुणांसाठी. हा ग्रंथ अलौकिक बुद्धिमत्ता, अचाट स्मरणशक्ती आणि चिकाटीचे उत्तुंग स्मारक आहे. अर्थात गीतारहस्याच्या माध्यमातून टिळकांचं संप्रदायिकरण झालं का असा प्रश्नही उपस्थित होतो.
डॉ. यशवंत रायकर

१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले. पहिल्या महायुद्धाच्या त्या काळात कागदाची तीव्र टंचाई होती. तरी मुंबईतील ऑपेरा हाऊसजवळील रे पेपर मिलने अगत्याने कागद पुरविला. सध्या पेपर मिल लेन त्याची आठवण मुकाटय़ाने जपते. पुण्यातील तीन छापखान्यात ते छापले गेले. आज ही प्रत हाताळताना ९४ वर्षांपूर्वीच्या टिळकयुगात गेल्याची अनुभूती मिळते. ‘‘मी ज्या शतकात जन्मलो त्या शतकाला भूषण होण्याजोगा ग्रंथ लिहिणार आहे’’ असे आत्मविश्वासाचे उद्गार टिळकांनी आधी काढले होते. ते मंदलेच्या तुरुंगात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संकल्पित गीतारहस्य साडेतीन महिन्यांत हाताने लिहून सार्थ केले. हा ग्रंथ म्हणजे अलौकिक बुद्धिमता, अचाट स्मरणशक्ती, अफाट ज्ञान तसेच भाषाप्रभुत्व, बौद्धिक शिस्त, दृढनिश्चय, चिकाटी, लिहिणाऱ्या हाताची क्षमता वगैरे गुणांचे उत्तुंग स्मारक आहे. टिळकांच्या लोकप्रियतेचा तो उच्चांक होता. तरी काळ प्रतिकूल होत असल्याची वेदनाही प्रस्तावनेत व्यक्त होते.

‘‘कृतान्तकटकाऽमल ध्वज जरा दिसो लागली।
पुर:सरगदांसवे झगडिता तनू भागली।।
अशी आमची स्थिती असून संसारातील सहचरीही पुढे निघून गेले. यासाठी आपल्याला उपलब्ध असलेली माहिती व सुचलेले विचार लोकांस कळवावे, कोणीतरी समानधर्मा सध्या अगर पुढे ते पुरे करील या समजुतीने हा ग्रंथ प्रसिद्ध केला आहे.’’ हे उद्गार हृदयस्पर्शी आहेत. त्यात काम अपुरे असल्याची जाणीव आहे. सप्टेंबर ११, १९०८ ते जून ८, १९१४ या बंदिवासातील दिवसांत नैराश्यावर मात करून टिळकांनी आपल्या दु:खाचे नवनिर्मितीच्या ऊर्जेत रूपांतर केले आणि एका अलौकिक कृतीला जन्म दिला.
त्यांच्यापुढे नियतीने काय वाढून ठेवले होते हे आज आपल्याला माहीत आहे. राम व श्रीधर या दोन्ही पुत्रांनी बौद्धिक बंडखोरी केली शिवाय ते धड मार्गाला लागले नाहीत. १९१७ ते २०च्या काळात टिळकविरोधी चळवळींनी जोर पकडला. आपल्या सभा उधळल्या गेल्याचे त्यांना पहावे लागले. टिळकांच्या पुण्याईचा राजकीय वारसा गांधींकडे जाणार हे स्पष्ट होत गेले. त्यातच मधुमेहासारखे शरीर पोखरून काढणारे दुखणे जडले. तरी गीतेतून स्फूर्ती घेणारा वटवृक्षासारखा विस्तारलेला हा महापुरुष आपल्याच ओझ्यामुळे वाकला नाही की सर्व सोडून कुटुंबाच्या कुंडीतले रोपटे बनला नाही. सतत जनजागृती व स्वराज्य यांचा विचार करीत अखेपर्यंत ताठ उभा ठाकला.
टिळकांच्या मनात गीतारहस्य जिज्ञासा वयाच्या १६व्या वर्षीच जागृत झाली. युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या उपदेशात निवृत्तीपर मोक्षाचे विवरण कशाला असा प्रश्न पडला. त्याचा पाठपुरावा करीत राहिल्यामुळे १९०८ साली ग्रंथ लिहिण्याइतकी तयारी झाली आणि १९१५ साली गीतारहस्याचा जन्म झाला. Works in the moments of insight willed. Are after years of labour fulfilled, या वचनाची प्रचीती येते.
गीतारहस्य हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही. भारतीय संस्कृतीच्या अभ्यासकांसाठी तो एक समृद्ध संदर्भग्रंथ तसेच बृहत्कोश आहे. सनातन धर्माचे वाङ्मय, त्याचा पसारा, त्यातील श्रद्धा, संकल्पना, सिद्धान्त, कथा, काव्य, विज्ञान तसेच त्याची गूढता, नैतिकता, ऐतिहासिकता, ऐहिकता वगैरे टिळकांच्या तोंडून समजून घेण्यासाठी गीतारहस्य वाचावे. नासदीय सूक्ताचे इंग्रजी-मराठी भाषांतरासह आकलन करून घेण्यासाठी गीतारहस्य उघडावे. गीता अर्थासकट समजून घ्यायची असेल तरी हा ग्रंथ उत्तम. समाजधुरीण, समाजशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक, साहित्यिक, कलावंत अशा सर्वासाठी ती एक खाण आहे. काय आहे हे माहीत असल्याखेरीज काय सुधारावे हे कळत नाही. यज्ञविधीचे कर्मकाण्ड म्हणून ज्याची बोळवण केली जाते त्या मीमांसाशास्त्रातले ग्रंथतात्पर्य काढण्याचे सात नियम पहावे. वकिलीच्या व्यवसायात टिळकांना मीमांक्षेच्या अभ्यासाचा उपयोग का झाला यावर प्रकाश पडतो.
नेहमी तोंडात असलेल्या अनेक शब्दांचे अर्थ गीतारहस्यातून स्पष्ट होतात, बारकावे उकलतात. येथे फक्त काही उदाहरणे घेऊ. भगवद्गीता म्हणजे भगवंताने गायलेले उपनिषद. भागवत म्हणजे भगवंतानी केलेला उपदेश. भागवत धर्मातच श्रीकृष्णाला भगवान म्हटले जाते. (मुलाचे नाव भगवान ठेवतात ते त्या अर्थाने.) उपनिषद शब्द मराठीत नपुंसक लिंगी असला तरी संस्कृतात स्त्रीलिंगी आहे म्हणून श्रीमत्भगवत्गीतासु उपनिषत्सु असे दोन स्त्रीलिंगी शब्द एकत्र येतात. गीता शब्द कोणत्याही ज्ञानपर ग्रंथास वापरला जातो. म्हणून गीता अनेक आहेत. वानगीदाखल टिळक २७ गीतांची तपशीलवार माहिती देतात. कर्म म्हणजे ‘करणे’, हालचाल, ‘व्यापार’ या अर्थाने गीतेत येतो; श्रौत किंवा स्मार्त कर्म म्हणून नव्हे. तसे कर्म करण्याच्या उत्तम साधनाला योग म्हटले आहे. पातंजल योग या अर्थाने हा शब्द गीतेत कमी वेळा येतो. ‘योग: कर्मसुकौशलम्’ हा अर्थ गीतेला अभिप्रेत आहे. म्हणजे तो प्रत्येकाच्या हिताचा प्रश्न होय. ‘आज गेम थियरीच्या हेतूशी त्याची तुलना करता येईल.
प्रस्थानत्रयीची ऐतिहासिक उकल टिळक आपल्या पद्धतीने करतात. वैदिक धर्मातील गुढतत्त्व काय यावर वेगवेगळ्या ऋषींनी वेळोवेळी उपनिषदांत आपले विचार मांडले. त्यांची एकवाक्यता करून बादरायणाने वेदान्तसूत्रे म्हणजेच ब्रह्मसूत्रे रचली. तथापि त्यात प्रवृत्ती मार्गाचे वर्णन आले नाही. ती उणीव कर्मयोग सांगून गीतेने भरून काढली. त्यामुळे उपनिषदे, वेदान्तसूत्रे व गीता यांना प्रस्तानत्रयी अर्थात वैदिक धर्माचे तीन आधारस्तंभ म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर प्रस्थानत्रयीत जे नाही ते अग्राह्य़ मानले जाऊ लागले. म्हणून आपापल्या संप्रदायाला प्रस्थानत्रयीत बसविण्यासाठी प्रत्येकाने गीतेचा सोयिस्कर अर्थ लावला. यातून शंकराचार्याचा संन्यास ज्ञाननिष्ठ अद्वैतवाद, रामानुजांचा विशिष्ठाद्वैतवाद, माध्वाचार्याचा द्वैतवाद, वल्लभाचार्याचा शुद्धाद्वैतवाद, निंबाकींचा द्वैताद्वैतवाद (पुढे गांधींचा अनासक्तियोग.) असे पंथ निर्माण झाले. अभ्यासाअंती ते सर्व नाकारून टिळकांनी ‘‘तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, युद्धाय कृतनिश्चय:’’ हाच मुख्य संदेश देणारे कर्मयोग शास्त्र मांडले. ‘कर्मयोगाला energism व सन्यासमार्गाला quietism असे दोन मौलिक शब्द टिळक देतात. या अर्थाने पाश्चिमात्य लोक कर्मयोगीच आहेत. energism विसरलो आहोत ते आम्ही असे आवर्जून सांगतात.
पाश्चिमात्य नीतिशास्त्र विचारात घेऊन गीतेवर भाष्य लिहिण्याचा ‘गीतारहस्य’ हा मराठीतील पहिलाच प्रयत्न होय. ही तुलना कुठे सदोष असल्यास त्यावर टिप्पणी करणे हे तत्त्वज्ञानाच्या जाणकारांचे क्षेत्र होय. पण टिळकांनी पथदर्शक ग्रंथ लिहिला हे नाकारता येणार नाही. गीतारहस्याची काही वैशिष्टय़े न. र. फाटक यांनी चांगली मांडली आहेत. गीतेच्या आकलनासाठी महाभारताचा उपयोग कसा होतो हे टिळकांनीच प्रथम दाखवून दिले. गीताभ्यासाची दिशा त्यांनी बदलून टाकली. गीतार्थ समजून घ्यायचा तर आधी भौतिक शास्त्रांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही हे निदर्शनास आणून दिले. या ग्रंथामुळे नीतिशास्त्रावर मराठीत लेखन करण्याची उमेद अभ्यासक्रमांमध्ये निर्माण झाली. पण एरवी परखड मते देणारे न. र. फाटक येथे टिळकांचे पक्षपाती होतात. गीतारहस्याला युगप्रवर्तक ग्रंथ म्हणणे ठीक पण त्याची तुलना डार्विनच्या ‘ओरिजिन ऑफ स्पीसीज्’शी करणे म्हणजे अति झाले. शंकराचार्याचा पक्ष मांडणारे सनातनी बुरसट विचाराचे असतील तरी त्यांची कुत्सित टिंगळ करणारा मजकूर सात पाने व्यापतो, पण विष्णु वामन बापटशास्त्र्यांनी गीतारहस्याचे खंडन नेमके कसे केले हे पुस्तकात येत नाही.
टिळकांची उणी बाजूही पाहणे आवश्यक आहे. कोणताही धर्मग्रंथ एकावेळी एकाहाती लिहिलेला नाही, त्यात स्थळकालानुरूप बदल झालेले आहेत हे एकोणिसाव्या शतकात अभ्यासकांमध्ये मान्य झालेले होते. तरी गीता व महाभारत एककालीन असल्याचे टिळक गृहीत धरतात. महाभारताच्या चिकित्सक आवृत्तीची आवश्यकता असल्याची वाच्यता १८९७ साली विंटरनिट्झने पॅरिस येथे केली होती. अखेर १९१९ साली पुण्याच्या भांडारकर ओरिएंटल इन्स्टिटय़ूटमध्ये कामाचा शुभारंभ झालेला होता. तरी टिळकांनी त्यात रस दाखविल्याचे ऐकिवात नाही. गीतासुद्धा भृगुकुळाच्या परंपरेची निर्मिती असून ती टप्प्याटप्प्याने विकसत गेलेली आहे. हे संशोधन नंतरचे असले तरी स्थळकालबद्धतेचा प्रश्न टिळकांच्या सूक्ष्म बुद्धीला शिवला नाही. याचे एकच कारण संभवते; तो त्यांना सोयीचा नव्हता. टिळकांचे संशोधन सत्यशोधनापेक्षा देशभक्तीला अधिक महत्त्व देणारे होते.
चातुर्वण्र्य हे परमेश्वराने गुणकर्म विभागश: केले (म्हणजे ते जन्मावर आधारित नाही) असे सांगणे हे गीतेचे धार्मिक मर्यादेतले पुरोगामी पाऊल होते. ‘‘गुणकर्मावर आधारित चातुर्वण्र्य हिंदुस्थानात लोपल्यासारखे झाले असले तरी पश्चिमेकडील देशात ते निराळ्या स्वरूपात आढळते,’’ असे विधान टिळक करतात. पण आपल्याकडील चातुर्वण्र्य सोज्वळ नाही. जन्मजात उच्चनीचतेच्या जातिव्यवस्थेपासून ते कधीच मुक्त नव्हते. पाश्चिमात्य देशात वर्गवारी असते पण जातवारी नसते. टिळक ज्याचा वारंवार आधार घेतात तो श्रेष्ठ तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट एका गरीब चांभाराचा मुलगा होता. त्याच्या बहिणी मोलकरणी होत्या. अन्याय त्याच्या वाटय़ाला आला तो त्याच्या उपेक्षित वर्गामुळे पण चांभार जात त्याला चिकटण्याचा प्रश्न नव्हता. थोडक्यांत, वरवरची तुलना करून सामाजिक वास्तवाच्या गंभीर प्रश्नाला टिळक बगल देतात.
खरे तर कोणतेही सत्य त्रिकालाबाधित (absolute) नसते; ते नेहमी सापेक्ष (relative, subjective) असते. सत्य हे बहुपेडी (plural) असते म्हणून गीतेतून अनेक अर्थ निघू शकतात. टिळकांनी तत्कालीन परिस्थितीनुसार कर्मयोगशास्त्र असा अर्थ लावला तो योग्यच होता. उदात्त ध्येयासाठी विजीगिषु स्फूर्ती देणारा धार्मिक ग्रंथ गीतेच्या रूपातच लोकमान्यांनी मिळवून दिला हे त्यांचे मोठे योगदान होय. पण शंकराचार्याच्या समोरचे वास्तव वेगळे होते. त्याला इस्लामची पाश्र्वभूमी होती. सनातन धर्म संघटित करण्यासाठी त्यांना बौद्ध भिख्खूंसारखे कर्मयोगी संन्यासी निर्माण करायचे होते. त्यानुसार ते वागले.‘‘आमचा कोणताही संप्रदाय नाही, असेल तर तो गीतेचा आहे,’’ असे टिळक आवर्जून सांगतात. पण देशभक्ती हा टिळकांचा संप्रदायच होता. त्यामुळे आधीच्या भाष्यकारांनी गीतार्थाला सोयीस्कर वळण देण्याचे जे तंत्र वापरले तेच टिळकांनी योजले. आपली सारी विद्वत्ता त्यासाठी पणाला लावली. पण याचा एक विपरीत परिणाम झाला. टिळकभक्ती म्हणजे देशभक्ती व टिळकांचा अभिमान म्हणजे देशाभिमान मानणारा, सतत भूतकाळाकडे पाहणारा, सुधारकांची टिंगल करणारा, मध्यमवर्गीय ब्राह्मणी संस्कृतीचा, अल्पसंतुष्ट सनातनी वर्ग उदयास आला. या वर्गातले काही सदस्य हिंदू समाजाच्या अधोगतीला जगन् मिथ्या सांगणारा शंकराचार्याचा मायावाद कारणीभूत होय असे मानणारे होते.
असे असले तरी गीतारहस्याच्या जनकाचे ऐतिहासिक महत्त्व तीळभरही कमी होत नाही. जीवनात नैराश्याचे ढग जमू लागलेले असताना, वयाच्या चौपन्नाव्या वर्षी धैर्याचा हा मेरुमणी गीतारहस्यातून संवाद साधतो तो पेन्शनरांशी नव्हे, तर तरुणांशी! त्यांना तळमळीचा सार्वकालीन संदेश देतो.
उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्यवरान् निबोधत।
टिळकप्रशंसा
'गीतारहस्य’ हा अत्यंत बोलका ग्रंथ असून तो वाचत असताना लो. टिळक आपणाशी संवाद साधत आहेत, इतकेच नव्हे तर आपण त्यांच्यासह प्रगती साधत आहोत असा अनुभव येतो.. देशाची प्रदीर्घ आध्यात्मिक परंपरा टाकून द्यायची नाही आणि सनातन धर्माचे नवे स्वरूप मांडायचे अशी टिळकांची भूमिका होती. या बाबतीत न्या. रानडे व म. गांधी हे त्यांचे समानधर्मी म्हटले पाहिजेत. पाश्चात्त्यांचा ेसुखवाद टिळकांना मान्य नव्हता. कारण त्यावर आधारलेली नीती टिकत नाही व सुखाची समान वाटणी करता येत नाही.. टिळकांनी आपल्या आयुष्याची सुरुवातच मरगळलेल्या समाजात चैतन्य आणण्याचा चंग बांधून केली होती आणि त्याचीच परिणती पुढे गीतारहस्य लिहिण्यात झाली.
- मे. पुं. रेगे, जानेवारी १९९८
लोकमान्य वास्तविक संस्कृतज्ञ, पण त्यांची भाषा अगदी साधी आणि सुबोध. अनेक पारिभाषिक शब्द त्यांनी तयार केले आणि त्यायोगे मराठी भाषा समृद्ध केली. त्यांच्या भाषेच्या साधेपणाचे रूपांतर सवंगपणात किंवा निर्जीवपणात होत नाही.. विद्वत्तेचा डौल मिरविण्याऐवजी अंत:करणाचा ठाव घेण्याकडेच त्यांचे लक्ष केंद्रित झालेले होते. लेखन हा एक स्वाध्याय आहे असे ते मानीत. लेनिनच्या शैलीशी काही बाबतीत त्यांचे साम्य आहे.-
- गोविंद तळवलकर
...Reformers of society are always in a minority and generally not liked; but due to Tilak, the Maharashtra social reformers became, in the eyes of the literates, objects of ridicule and hate.-
-P. D. Jagirdar, 1971...
ओरायन’मध्ये ज्योतिषविषयक ज्ञान, ‘आर्याचे वसतिस्थान’ यामध्ये रम्य कल्पनाचातुर्य आणि गीतारहस्यात खोल तात्त्विक विचार. पहिला ग्रंथ विशिष्ट ज्ञानप्रचुर, दुसरा प्रतिभोद्दीपित आणि तिसरा पांडित्यमंडित असा आहे. दुसऱ्या दृष्टीने असे म्हणता येईल की पहिला व दुसरा ग्रंथ सात्त्विक-राजस व तिसरा शुद्ध राजस गुणदर्शक आहे.-
-तात्यासाहेब केळकर
(हे उद्गार टिळकप्रशंसेचे उत्तम quotation ्ल होय. वरील तीनही ग्रंथांतील टिळकांची मते बिनचूक व निर्दोष आहेत असे न. र. फाटक गृहीत धरून चालतात आणि गोविंद तळवलकर फाटकांवर विसंबून राहतात. त्यांचा आवाज महाराष्ट्रात शिष्टसंमत झाला.)

13 August, 2009

दवंडी : पळा रे पळा.. आकाश पडलं !!!

माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..

एकदा एका राज्यात एक राजा राज्य करीत होता. (प्रत्येक कथेची सुरुवात अशीच करायची असते.) एकदा त्याचे केस कापताना त्याच्या नाभिकाच्या असे लक्षात आले की, राजाला तीन कान आहेत. त्याला हसू आले. राजाने त्याला दटावले. कोणालाही हे सांगितलेस तर मुंडके उडवीन अशी धमकी दिली. त्या नाभिकाची मोठी पंचाईत झाली. आपल्याला एवढे मोठे रहस्य माहीत आहे आणि आपण ते कुणालाच सांगायचे नाही? बायकोलाही नाही? हैराण झाला तो.. दोन दिवस त्याने कळ काढली, पण मग त्याच्या पोटातच दुखू लागले. शेवटी तो एका जंगलात गेला आणि एका हरणाच्या कानात त्याने ही गोष्ट सांगितली.. राजाला तीन कान.. मन मोकळे झाले. पोटदुखी थांबली. तो परत आला. पुढे कुणी तरी त्या हरणाची शिकार केली. त्याच्या चामडय़ापासून कुणी तरी वाद्य केले. वाद्य वाजवणारा राजाचे मन प्रसन्न करण्यासाठी राजवाडय़ात आला. त्याने वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि त्यातून राजाला तीन कान, राजाला तीन कान असेच बोलू उमटू लागले.


तात्पर्य काय, एखादी गोष्टी कितीही दाबून टाकली तरी ती केव्हा तरी समोर येतेच. कशीही येते, पण आजकाल एवढा काळ थांबायची गरज राहिलेली नाही आणि जंगलात जाऊन हरणाचे कान फुंकायचीही गरज राहिलेली नाहीए. अशी हरणं पावलोपावली भेटतात. आणि त्यांच्या कानात बातम्या सोडणाऱ्या माध्यमांचा तर काय सुकाळूच झालेला आहे.

कुणीतरी म्हटलेलं आहे की, बॅड न्यूज इज अ व्हेरी गुड न्यूज. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही.. माणूस कुत्र्याला चावला तर होते. त्यामुळे सध्या माध्यमांना सुगीचे दिवस आलेले आहेत. स्वाइन फ्लू या रोगाने त्यांचा बातम्यांचा प्रश्न सोडवून टाकलेला आहे. कुणाला माझं बोलणं क्रूरपणाचं वाटेल, पण जरा नीट शांत डोक्याने विचार करा. सगळे डॉक्टर्स ओरडून सांगत आहेत की, स्वाइन फ्लू हा प्रश्नणघातक रोग नाहीए. जे बळी गेले ते एक तर निष्काळजीपणाचे आहेत किंवा त्यांना एकाच वेळी अनेक आजार झाले होते. ज्याचे निदान झाले तर केवळ सहा दिवसांमध्ये माणूस खडखडीत बरा होतो अशा या रोगाला जणू काही प्लेगची साथ आली आहे असे स्वरूप देण्यास माध्यमे कारणीभूत आहेत.

दिल्लीमें स्वाइन फ्लू का एक रोगी मिला.. स्कूलमें लगा ताला.. अहमदाबादमे स्वाइन फ्लूने किया हमला.. एकने गवाँई जान किंवा पुण्यात हाहा:कार.. जनतेत घबराट.. अशा बातम्या देऊन लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण करण्यात येते आहे. होय, आहे. हा आजार आहे. त्याचा प्रसार शिंकांतून, खोकल्यातून होतो. काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे सगळं खरं असलं तरी साप साप म्हणून भुई धोपटण्यासारखा प्रकार होतो आहे. सरकार पातळीवरून पत्रकबाजी करून त्यात आणखी भर टाकली जाते आहे.

मेक्सिकोसारख्या देशाने अत्यंत कमी कालावधीत या रोगाचे जवळपास उच्चाटन केले. सोपी गोष्ट. गर्दी टाळा. सगळी पब्लिक फंक्शन्स बंद करा. शाळा-कॉलेज ऑफिसेस काही काळ बंद करा. सहा दिवसांचे या व्हायरसचे आयुष्य आहे. त्यानंतर तो मरेल. त्यांनी हे केले. आपल्याकडे हे होणार नाही. कारण आपल्याला उत्तरं शोधायची नाहीएत. प्रश्नांचा बागुलबुवा करून त्यावर पोळी भाजून घेण्यात आमच्या लोकांना रस आहे. या रोगावर टॅमी फ्लू नावाची एक गोळी आहे. पण ती म्हणे फक्त सरकारी दवाखान्यातच मिळते. का? का नाही सगळीकडे मिळत? रक्त तपासणी करणाऱ्या लॅब इतक्या कमी का? सरकारी इस्पितळाची परिस्थिती पाहिली तर तिथे लोकांनी येऊन कल्ला करावा असं करण्यामागची मनोवृत्ती आणि गर्दीच्या वेळी नाकाबंदी लावून लोकांचे हाल करणे किंवा तेव्हाच रस्त्याची कामे काढणे यामागची सरकारी मनोवृत्ती एकच आहे. लोकांना त्रास झाला पाहिजे. लोकांनी आपल्याकडे दयेची भीक मागितली पाहिजे. नाही तर मग आम्ही नेते कसे? लोकांचे प्रश्न सुटले तर आपल्याकडे कोण येईल? लोक कायम रंजलेले गांजलेले राहिले तरच या तथाकथित नेत्यांना महत्त्व आहे.

जरा आकडेवारी पाहा. पुण्याची लोकसंख्या साधारण पस्तीस लाख. त्यात रुग्ण ११८. मुंबईची लोकसंख्या किती? दीड कोटी. रुग्ण किती ५५. काय गुणोत्तर प्रमाण आहे? नगण्य. पुण्यामध्ये आणि मुंबईत लाखो लोकांना टीबी झाला असेल. जो जास्त धोकादायक आहे. त्याचाही प्रसार थुंकीतून, श्वासातून होतो. त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. साध्या फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या स्वाइन फ्लूच्या बळीपेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे. सांगणारे कंठशोष करून सांगतात. पण ऐकतो कोण? माध्यमांची ताकद वाईट गोष्टींसाठी वापरली जाते आहे.

जगात कोणत्याही गोष्टीची विक्री ही केवळ भीती या भावनेनेच करता येते. फिअर फॅक्टर महत्त्वाचा, असं केलं नाही तर तसं होईल. की आपण लागलो धावायला. एका सशाच्या पाठीवर झाडाचं पान पडलं तर तो वळूनही न पाहता आकाश पडलं, आकाश पडलं, म्हणून धावत सुटला. समोर दिसेल त्याला सांगत सुटला.. पळा रे पळा.. आकाश पडलं. तसं आपलं झालंय. अत्यंत शांतपणे संघटितपणे याचा मुकाबला आपल्याला सहज करता येईल असं का नाही वाटत आपल्याला? आणि एवढं आपलं काळीज जर सशाचं असेल तर मग खरोखरीची भयग्रस्त करणारी परिस्थिती आली, तर आपण त्याला कसं तोंड देणार आहोत. माध्यमांनी मनोबल वाढवायचं की खच्ची करायचं? याच्याकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही? का पेपरात आलेली प्रत्येक बातमी आणि टीव्हीवर आलेली प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही ‘बाबा वाक्यम प्रमाणम’ म्हणून आपण त्यावर आपलं जीवन अवलंबून ठेवणार आहोत? या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. स्वाइन फ्लू उद्या जाईल, पण त्यातून काही धडा आपण शिकणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे.

15 November, 2008

.

"मोहोलेशे" ते "महाराष्ट्र" - अ.रा. कुलकर्णी
ह्यू एनत्संग या चिनी प्रवाशाने इ.स. ६४०-४१ च्या सुमारास महाराष्ट्रास भेट दिली होती. या देशाची संपत्ती, येथील प्रशासकीय कुशलता, आणि लोकांचे स्वभावविशेष यामुळे तो प्रभावित झाला होता. महाराष्ट्राला तो `मोहोलेश' म्हणतो, आणि या देशाच्या लोकस्थितीचे वर्णन करणारा कदाचित तो पहिलाच परदेशी प्रवासी असावा. तो म्हणतो, `महाराष्ट्राची भूमी सुपीक असून ते धनधान्याने समृद्ध आहे. तेथील लोक साधे, प्रामाणिक पण तापट आहेत. त्यांच्या जे उपयोगी पडतात त्यांशी ते कृतज्ञ असतात. पण त्यांना कोणी दुखविले तर ते सूड घेतल्याखेरीज राहात नाहीत. लढाईत पळपुट्यांचा ते पाठलाग करतात; पण शरण आलेल्यांना ते मारीत नाहीत. राजाजवळ हजारो शूर शिपायांचे सैन्य नित्य खडे असते. या प्रदेशाला `दंडकारण्य' असेही म्हणत आणि या प्रदेशाचे नाग, मुंड, भिल्ल इत्यादी आदिवासी समाज हे मूळ रहिवाशी होते. नंतरच्या काळांत उत्तरेकडून आर्य, शक, हूण लोक आले; दक्षिणेकडून द्रविडी लोक आणि सागरे मार्गाने परदेशी लोक आले. या सर्वांनी मिळून महाराष्ट्राची वसाहत केली, आणि महाराष्ट्राच्या रहिवाशांना `महारट्ट' म्हणून ओळखले जाऊं लागले.
महाराष्ट्राची प्राचीनता साधारणपणे इ.स.पू. तिसऱ्या शतकापर्यंत नेता येईल. कारण संस्कृत भाषेपासून उदयाला आलेली महाराष्ट्री भाषा ही इ.स.पू. चवथ्या अथवा तिसऱ्या शतकांत प्रचारात होती असे तज्ज्ञांचे मत आहे. आजची या प्रदेशाची मराठी भाषा या महाराष्ट्री-प्राकृत भाषेपासून विकसित झाली असून इ.स. च्या १०व्या शतकापासून ती प्रचलित झाली असावी. महाराष्ट्र हे नांव देखील या भाषेवरूनच पडले असावे. कालौघात या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात अपरान्त, विदर्भ, कुंतल, मूलक व अश्मक यांचा अंतर्भाव झालेला दिसतो.

मौर्य ते यादव (इ.स.पू. ते स. १३१० सुमारे २२०) :
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्रज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती. वाकाटकांनंतर कलचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणी इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले. महाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली.
यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

मुसलमानांची राजवट:
इ,स, १२९६ मध्ये अल्ला‍उद्दिन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला. आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना प्रायः दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दिनाच्या कार्याची पूर्ती केली. आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली. अल्ला‍उद्दिनाचे अनुकरण मुहम्मद तुघलक (इ. स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत प्रस्थापित केली. मात्र दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहमनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहमनी घराण्याची स्थापना झाली ती सुमारे १५० वर्षे टिकली. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहमनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे गोवळकोंड्याची कुत्बशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर सहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाच शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.

मराठे:
सतराव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्रावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला. `मराठा' हा शब्द इतिहासाच्या दृष्टीने जातिवाचक नसून त्यांत महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा प्रामुख्याने समावेश होतो. असे असले तरी महाराष्ट्रावर राजकीय सत्ता ही मुख्यत्वेकरून `मराठा' जातीने प्रस्थापित केली होती. हे मराठी भाषिक मराठे मूळचे कोण हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. मराठा हे नामाभिधान महाराष्ट्र देशापासून आले आहे, का मराठे या येथील रहिवाश्यांमुळे या देशाला महाराष्ट्र हे नांव मिळाले आहे हे सांगणे कठिण आहे. रिस्ले या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने शक-द्रविडांच्या मिश्र जमातीपासून मराठे उदयाला आले असा सिद्धांत मांडला होता. पण तो आता त्याज्य ठरला आहे. अर्थात महाराष्ट्रातील अनेक आदिवासी जमातींचा मराठ्यांच्या उत्पत्तीशी संबंध असावा हे सर्वस्वी नाकारता येणार नाही. मराठ्यांच्या अनेक कुळी देवक अथवा वंशचिन्ह मानणाऱ्या आहेत. खंडोबा आणि भवानी या मराठ्यांच्या प्रमुख देवता या आदिवासी स्वरूपाच्या आहेत.
मराठे आणि महाराष्ट्र यासंबंधीचे संदर्भ कांही परदेशी प्रवाशांच्या वृत्तांत आढळतात. यात अल्‌बेरुनी (इ.स. १०३०) फ्रायर जॉर्डनस (इ.स. १३२६ च्या आसपास), इब्न बतूता (इ,स, १३४०) यांच्या लिखाणारून असे उल्लेख आले आहेत. परंतु राजकीय क्षेत्रावर मराठ्यांच्या उदय खऱ्या अर्थाने सतराव्या शतकातच झाला. मराठ्यांच्या उदयाची कारणे इतिहासकारांनी निरनिराळी दिली आहेत. मराठ्यांच्या प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफ यांच्या मते हा उदय सह्याद्री पर्वतात वणवा पेटावा तसा, अगदी दैवघटित परिस्थितीमुळे झाला. न्यायमूर्ती रानड्यांना मात्र प्रामाणिक प्रयत्न करून मराठ्यांनी आपला उदय करून घेतला असे वाटते. राजवाडे यांच्या मते परदेशी आणि दख्खनी मुसलमानांचे वर्चस्व रोखण्याकरता अहमदनरच्या निजामशहाने मराठ्यांना आपल्या दरबारांत हेतुपूर्वक उत्तेजन देऊन एक `मराठा पक्ष' निर्माण केला, आणि त्यातूनच मराठ्यांचा उदय झाला. भोसले, जाधव, निंबाळकर, मोरे, घोरपडे, माने, घाटगे, डफळे, सावंत, शिर्के, महाडिक, मोहिते इत्यादी मराठे सरदार निजमाशाही अथवा आदिलशाहीच्या चाकरीत असल्याने लष्करी आणि मुलकी प्रशासनाचे त्यांना उत्तम शिक्षण मिळाले होते. मालोजी भोसले (अंदाजे इ.स. १५५२ ते १६०६) हा निजामशाहीत एक छोटासा शिलेदार म्हणून नोकरीस लागला. त्याचा पुत्र शहाजी (१५९९ ते १६६४) याने तर निजामशाही, मुघल आणि आदिलशाही यांच्याकडे नोकरी करून बरेच श्रेष्ठत्व मिळविले होते. मराठ्यांच्या उदयास प्रारंभ मालोजी-शहाजीपासून झाला असे मानण्यास हरकत नाही.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी राजा:
शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९.२.१६३० (जुनी तारीख ६.४.१६२७) रोजी झाला. मराठी राष्ट्र हे शिवाजी राजांची निर्मिती होय. शहाजीने आपली पुणे, सुपे येथील जहागीर, जी प्रायः स्वतंत्र होती. ती शिवाजी राजांना बहाल केली. त्यांनी मावल, कोकण, आणि देश या प्रदेशातील लोकांच्या समोर स्वराज्याचे, महाराष्ट्र धर्माचे ध्येय ठेवून त्यांना संघटित केले, आणि परकी सत्तांना परभूत करून स्वराज्य स्थापन केले. या नूतन महाराष्ट्र राज्याला कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासन देऊन त्यांनी ते भक्कम पायावर उभे केले. आर्थिक दृष्ट्या देखील ते स्वावलंबी बनविले. सर्वधर्मसमभावाचे तत्व आचरून सर्व धर्म पंथांना आपल्या राज्यांत सामावून घेतले. आपल्या राज्याभिषेक प्रंसंगी (१६७४) राजशक सुरू करणारा, आणि स्वतःची शिवराई आणि होन' ही सोन्याची नाणी चालू करणारा शिवाजी राजा हा पहिला मराठी छत्रपती होय. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे-वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी (५ एप्रिल १६८०) महाराष्ट्रांत एक पोकळी निर्माण झाली. मध्ययुगाच्या इतिहांसातील शिवाजी महाराजांचे स्थान सुप्रसिद्ध वंग इतिहासकार, यदुनाथ सरकार यांनी आपल्या शिवचरित्रांत विशद केले आहे. ते म्हणतात, " शिवाजी राजा हा केवल मराठी राष्ट्राचा निर्माता नव्हता, तर तो मध्ययुगांतील एक सर्वश्रेष्ठ रचनाकार, लोकोत्तर पुरुष होता. राज्ये नष्ट होतात, साम्राज्याचे विघटन होते, राजघराणी नेस्तनाबूत होतात, परंतु `लोकनायक राजा' अशा शिवाजी राजाची स्मृती म्हणजे मानवजातीला मिळालेला एक अक्षय ऐतिहासिक वारसा होय."
शिवाजी राजांचा पुत्र संभाजी (इ.स. १६५७-८९) याची कारकीर्द अवघे नऊ वर्षांची झाली. या छोट्या काळांत त्याला अंतर्गत कलह आणि शिद्दी, पोर्तुगीज, मुघल यासारखे शत्रू यांच्याशी मुकाबला करावा लागला. मुघलांच्या हातून त्याचा १६८९ साली जो अमानुष वध झाला त्यामुळे मराठी लोकामध्ये देशप्रेमाची जाज्वल्य भावना निर्माण झाली, आणि शिवाजी महाराजांचा कनिष्ठ पुत्र राजाराम (१६७०-१७००) याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. आपला बलाढ्य फौजफाटा घेऊन औरंगजेब बादशहाने मरेपर्यंत (१७०७) मराठी सत्ता नेस्तनाबूत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला.
राजारामाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी ताराबाई हिने स्वातंत्र्ययुद्धाची सुत्रे आपल्या हाती घेतली, आणि आपला पुत्र दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले. परंतु औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेला संभाजीचा पुत्र शाहू याची जेव्हा १७०७ साली सुटका झाली तेव्हा शाहूपक्ष आणि ताराबाई पक्ष असे दोन तट मराठी राज्यात पडले आणि त्यांच्यात यादवी युद्धाला सुरवात झाली. शाहूने साताऱ्यास तर ताराबाईने पन्हाळ्यास आपली स्वंतत्र गादी स्थापन केली. या दुसऱ्या गादीच्या संदर्भात १७१४ साली एक राजवाड्यांतच छोटीशी राज्यक्रांती कोल्हापुरात झाली. आणि राजारामाचा दुसरा पुत्र संभाजी (इ.स. १६९८ ते १७६०) यास कोल्हापूरची गादी मिळाली. शाहूने वारणेच्या तहान्वये (१७३१) संभाजीस कोल्हापूरचा छत्रपती म्हणून मान्यता दिली.

पेशवेशाहूच्या आमदानीत रायगड जिल्ह्यांतील भट घराणे मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्धीस आले. बाळाजी विश्वनाथ भट याने शाहूला त्याचे स्थान बळकट करण्यास मदत केल्याने त्यास पेशवे पद (१७१३-१७२०) प्राप्त झाले. मुघलांच्याकडून त्याने स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा आणल्या. त्याचा मुलगा पहिला बाजीराव ( पेशवा १७२० ते १७४०) याने पेशवाईची वस्त्रे स्वीकारल्यावर आक्रमक धोरणाचा अवलंब केला आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उतरंडीस लागलेल्या मुघल साम्राज्याच्या विनाशातून मराठी सत्तेची वाढ करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. त्याने मराठी सरदारांना उत्तरेचे दालन उघडून दिले, आणि यातूनच पुढे मराठ्यांनी छोटी छोटी राज्ये तिकडे निर्माण झाली. गुजरात, माळवा, बुंदेलखंड इत्यादी प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आले, आणि शिंदे, होळकर, गायकवाड, पवार यांच्यासारखे नवे मराठे सरदार उदयास आले. यदुनाथ सरकारांच्या मते बाजीरावाने बृहन-महाराष्ट्राची निर्मिती केली, आणि पुणे हा भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. बाजीराव पेशवा हा संपूर्णतया शिपाई गडी, एक देवजात शिलेदार होता. आपल्या छोट्याशा कारकीर्दीत त्याने दख्खन प्रदेशात मराठ्यांचे श्रेष्ठत्व आणि उत्तरेस मराठ्यांचे धुरीणत्व प्रस्थापित केले.
बाजीरावानंतर पेशवेपद हे भट घराण्यांत जवळजवळ वंशपरंपरा बनले. बाजीरावाचा पुत्र बालाजी तथा नानासाहेब (पेशवा १७४०-१७६१) याने मराठ्यांचे झेंडे अटकेपार फडकाविले. शाहूचा मृत्यू १७४९ साली झाला. त्याचा दत्तक पुत्र रामराजा हा कर्तृत्ववान नसल्याने नामधारी छत्रपती राहिला व सर्व सत्ता पेशव्यांकडे केंद्रीत झाली. १७६१ साली अहमदशहा अब्दालीकडून पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. मराठी सत्तेला शह मिळाला पण ती नेस्तनाबूत झाली नाही. नानासाहेबाचा पुत्र पेशवा पहिला माधवराव ( पेशवा १७६१-१७७२) याने शत्रूंचा बीमोड करून आणि उत्तम प्रशासन करून मराठ्यांचे वर्चस्व पुनश्च प्रस्थापित केले. पण त्याचा अकाली मृत्यू हा मराठी सत्तेला शाप ठरला. ग्रॅण्ट डफ म्हणतो, या गुणवंत पेशव्याचा अकाली मृत्यू हा मराठी साम्राज्याला पानिपतापेक्षा फार हानिकारक ठरला. गृहकलहाने त्याचा भाऊ पेशवा नारायणराव (१७७३) याचा अमानुष वध केला. नारायणरावाच्या मरणोत्तर जन्माला आलेला त्याचा पुत्र पेशवा माधवराव दुसरा (पेशवा १७७३-१७९५) याने कारभाऱ्यांच्या सहाय्याने ( ज्यांना बारभाई म्हणत ) मराठी राज्याची धुरा सांभाळली. यात महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोन कारभाऱ्यांचा मोठा वाटा होता. छत्रपतीकडून पेशव्यांकडे आलेली सत्ता आता कारभाऱ्यांकडे गेली.
याच सुमारास पश्चिम किनाऱ्यावर ठाण मांडून बसलेले इंग्रज हळूहळू मराठ्यांच्या राजकारणांत प्रवेश करू लागले होते. वस्तुतः १७८१ साली, पहिल्या इंग्रज-मराठे युद्धात, मराठ्यांनी त्यांना नमविले होते; परंतु शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव ( पेशवा १७७५-१८१८ ) हा संपूर्णतः त्यांच्या आहारी गेला आणि १८१८ साली मराठी सत्ता संपुष्टात आली. मराठी राज्याची वासलात लावणाऱ्या माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने मराठ्यांची सहानुभूती मिळविण्याच्या हेतूने साताऱ्याचे छोटेसे राज्य निर्माण केले आणि त्यावर प्रतापसिंह (१७९३-१८७४) या एका छत्रपतीच्या वंशजाची `राजा' दुय्यम प्रतीचा किताब देऊन नेमणूक केली. पुढे १८३९ साली त्याला पदच्युत करून त्याचा भाऊ शहाजी उर्फ आप्पासाहेब यास साताऱ्याची गादी देण्यात आली, आणि पुढे १८४९ सालीं हे साताऱ्याचे राज्य खालसा करण्यात आले.
अशा रीतीने सुमारे दोनशे वर्षे भारताच्या राजकीय इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या मराठ्यांची सत्ता नामशेष झाली.मराठ्यांची परंपरा आणि इतिहास हा असा उज्वल आहे. यदुनाथ सरकार यांनी मराठ्यांची भारतीय इतिहासांतील कामगिरी समर्पक शब्दांत व्यक्त केली आहे. ते म्हणतात, `आजच्या भारतात त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे, मराठ्यांना एक अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या अगदी नजीकच्या पूर्वजांनी अनेक समरांगणावर आपले देह अर्पण केले आहेत; त्यांनी सेनापतीपदे भूषविली, राजनीतीक्षेत्रांत भाग घेतला, राज्याची आर्थिक बाजू सांभाळली, साम्राज्याच्या समस्यांशी सामना केला, आणि स्मृतिआड न झालेल्या नजीकच्या काळातील भारताच्या इतिहासाच्या घडणीस हातभार लावला. या सर्व गोष्टींच्या स्मृती म्हणजे या जमातीचा अमूल्य ठेवा होय'

इंग्रज शिवाजी महाराजांचा उदय होत असतानाच इंग्रज आपली व्यापारी मक्तेदारी पश्चिम किनाऱ्यावर मिळविण्याच्या प्रयत्नांत होते. शिवाजी राजांची वाढती सत्ता ही त्यांना धोकादायक वाटत होती. शिवाजी महाराजांनी त्यांना व्यापाराच्या सवलती दिल्या, पण मराठी भूमीवर ते पाय रोवून उभे राहणार नाहींत याची दक्षता ठेवली. कारण व्यापाराचे निमित्त करुन प्रदेश बळकावयाचा ही त्यांची सुप्त इच्छा महाराजांना उमजली होती. पण इंग्रजांची ही कुटिल नीती पेशव्यांच्या ध्यानी न आल्याने नानासाहेब पेशव्याने त्यांना मराठ्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी उपलब्ध करून दिली, आणि १७५४ साली कुलाब्याच्या आंगऱ्यांच्या आरमाराचा धुव्वा उडविला. मराठेच स्वतःचे संहारक आहेत हे आतापवेतो इंग्रजांनी ओळखले होते. मद्रासच्या लष्करी पत्रसंग्रहातील १७ एप्रिल १७७० च्या एका पत्रात म्हटले आहे की आपापसातील कलहामुळे मराठे आपला विनाश ओढवून घेतील हे आता लक्षात आले आहे, आणि त्याला तशी सबळ कारणे आहेत. मराठे सरदार हे एकमेकाविरुद्ध मिळणारी एकही संधी दवडणार नाही हे हिंदुस्थानांतील इतर सत्तांना लाभदायकच ठरणार आहे.परंतु मराठ्यांना मुळासकट उखडून काढणारा यशस्वी मुत्सद्दी म्हणजे माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हा होय. १८११ साली तो प्रथम पुण्यांत रेसिडेंट म्हणून आला. मराठ्यांची सत्ता नष्ट करण्याचे मनसुबे त्याने रचले. १८१७ साली अखेरच्या इंग्रज-मराठे युद्धाला तोंड फुटले, आणि शेवटी ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीराव हा माल्कमला शरण गेला; आणि मराठी राज्याचे वैभव नष्ट झाले.
पेशव्यांपासून जिंकून घेतलेल्या प्रदेशावर १८१९ साली कमिशनर आणि नंतर मुंबई प्रांताचा गव्हर्नर बनला. महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीची पायाभरणी एलफिन्स्टनने केली. प्रशासनांत त्याने विशेष बदल काही केले नाहीत, पण जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावणे, शैक्षणिक धोरण अवलंबिणे, पेशव्यांच्या दक्षिणा फंडातून संस्कृत कॉलेज ( जे पुढे डेक्कन कॉलेज बनले ) स्थापन करणे इत्यादी महत्त्वाची कामे त्याने केली.

इंग्रज सत्तेविरुद्ध बंडावा:
मराठ्यांना इंग्रजांची राजवट केव्हांच रुचली नाही. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध ते सतत बंडावा करीत. उमाजी नाईकाच्या नेतृत्वाखाली १८२६ सालीं पुणे जिल्ह्यांतील रामोशांनी बंड करून इंग्रजांना सतावून सोडले, आणि शेवटी त्यांना समझोता करावयास लावला. सरकारने रामोश्यांचे गुन्हे माफ केले, त्यांना सरकारी नोकरीत प्रवेश दिला आणि इनाम जमिनीही दिल्या. नाशिकचा राघु भांग्‌ऱ्या, नगरचा रामजी आणि त्याचा साथीदार रतनगडचा किल्लेदार गोविंदराव खारी यांना इंग्रज सत्तेला शह दिला. पुणे आणि नगर जिल्ह्यांतील कोळीही संघटित झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या साऱ्या अशिक्षित आणि दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या निःशस्त्र लोकांनी इंग्रज सत्तेला विद्वानांच्या स्वातंंत्र्य लढ्यापूर्वी कितीतरी आधी आव्हान दिले होते.१८५७ च्या उठावात महाराष्ट्राचा फारसा वाटा नव्हता. पण या उठावाचे पुढारी नानासाहेब, तात्या टोपे, झांशीची महाराणी लक्ष्मीबाई ही सारी मंडळी होती.१८५७साली पुणे, सातारा, नगर येथील शेतकऱ्यांनी जुलमी सावकारांच्या विरुद्ध उठाव केला. ब्रिटिशांच्या पाठिंब्यामुळे हे सावकार जुलूम करीत होते. शेतकऱ्याचे दंगे या नावांने ही घटना ओळखली जाते. न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांनी रयतेची बाजू मांडली. सरकारने नंतर १८७९ साली डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलिफ ऍक्ट पास करून शेतकऱ्यांना संरक्षण दिले.
वासुदेव बळवंत फडके याने सशस्त्र प्रतिकाराच्या धोरणाचा अवलंब करून इंग्रजांना हुसकावून भारतीय गणराज्याची स्थापना करण्याची मोहीम १८७९ साली सुरू केली. पण त्याला यश आले नाही. त्याला अटक करून एडन येथे कारावासात ठेवले. तेथेच तो १८८३ सालीं मरण पावला. पुढे चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ साली पुणे येथे रॅंड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांचे खून केले, आणि फाशीची शिक्षा स्वीकारली. मराठ्यांचा इंग्रजांना सतत विरोध राहिला याचे कारण त्यांनी आपल्या सर्वस्वाचे अपहरण केले आहे याचे त्यांना कधीच विस्मरण पडले नाही. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकला तो मराठ्यांच्या पराभव करून, आणि म्हणूनच मराठ्यांचा आपल्याला विरोध राहणार याची त्यांना कल्पना होती जी. डब्ल्यू. स्टीव्हन्सने १८९९ साली प्रसिद्ध झालेल्या इंडिया ऑफ यस्टर इयर्स या पुस्तकात ती व्यक्त केली आहे.

सामाजिक सुधारणा चळवळी:
मुंबई, पुणे यासारख्या नगरांतील बुद्धिवादी लोकांवर पाश्चिमात्य शिक्षणाचा जो प्रभाव पडत होता यातूनच एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा प्रारंभ झाला. या सुधारकांनी अंतर्मुख होऊन आपली समाजव्यवस्था, धार्मिक रूढी, यांचा चिकित्सकपणे अभ्यास करून राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. प्रारंभी या कार्यात त्यांना सनातनी लोकांकडून कडवा विरोध सहन करावा लागला. बाळशास्त्री जांभेकर (१८१२-४६) यांनी सतीची चाल, लहान मुलींची हत्या, या रुढींचा धिःकार तर केलाच, परंतु हिंदू धर्माचा त्याग करून परधर्म स्वीकारलेल्या लोकांना परत स्वधर्मात यावयाचे असेल तर शुद्धीकरणाची मुभा असली पाहिजे यासाठी झगडा केला. गोपाळ हरी देशमुख तथा लोकहितवादी (१८२३-९२) यांनी आपल्या शतपत्रे या संग्रहातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना विरोध करणाऱ्या सनातनी ब्राह्मणांवर कडाडून हल्ला केला. जोतीराव गोविंदराव फुले (१८२७-१८९०) यानी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जाती व्यवस्थेवर आघात केले, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि मागासलेल्या समाजांतील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जीवापाड मेहनत केली. रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांनी सामान्य सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रार्थना समाज स्थापण्याच्या कामी पुढाकार घेतला. गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५) यांनी सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) यांनी तर आपले सारे जीवन स्त्रीशिक्षणासाठी समर्पित केले. बेहरामजी मलबारी (१८५३-१९१२) या मुंबईच्या पारशी सुधारकाने सर्व जातींच्या स्त्रियांसाठी सेवा सदन ही संस्था काढली. पंडिता रमाबाई (१८५८-१९२२) यांनी शारदा सदन संस्था काढून वरिष्ठ वर्गातील विधवा स्त्रियांना संरक्षण दिले.
ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवी धारण करणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढली. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२) यांनी जाति संस्थेला विरोध केला, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि आपल्या संस्थानात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील (१८८७-१९५९) यांनी महात्मा फुले, महर्षी शिंदे आणि शाहू महाराज यांच्या कार्याची परंपरा चालविली. डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा महाराष्ट्राला सतत अभिमान वाटेल. त्यांनी हरिजन जमातीमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण केली. भारताच्या संविधानाचे ते प्रमुख शिल्पकार होते. हिंदु धर्मातील अनिष्ट आणि जुलमी रूढी आणि परंपराशी ते सतत झगडत राहिले.

महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य संग्राम :
भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन १८८५ साली महाराष्ट्राच्या राजधानीत-मुंबईस-भरले होते. समाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांबद्दल लोकमत बनविण्यासाठी न्यायमूर्ती रानड्यांनी निरनिराळ्या संस्था काढल्या आणि राष्ट्रीय चळवळीला उदारमतवादाची दिशा दाखविली.दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, ही मुंबईची पारशी मंडळी कॉंग्रेसच्या धुरीणांपैकी होती. १८९० ते १९२० या कालखंडातील महाराष्ट्राचे दोन राजकारण धुरंधर म्हणजे बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०) आणि गोपाळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५). शिवाजी उत्सव आणि गणेश उत्सव यांच्या माध्यामातून टिळकांनी बहुजन समाजाला देशाच्या राजकारणांत आणले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र त्यांनी स्वांतत्र चळवळीला दिला. भारतातील असंतोषाचे जनक अशी त्यांची ओळख इंग्रजांनी करून दिली आहे. न्यायमूर्ती रानड्यांचे शिष्य गोखले हे बुद्धिवाद्यांचे पुढारी होते. समन्वय आणि समझोता हे त्यांच्या राजकीय धोरणाचे मुख्य सूत्र होते. महाराष्ट्र हा लढाऊ वृत्तीच्या लोकांचा देश असल्याने जनमानसावर लोकमान्यांच्या विचारसरणीचा अधिक प्रभाव होता.
अभिनव भारत या दहशतवादी विचारसरणीचा विश्वास असणाऱ्या संस्थेचे अध्वर्यू विनायक दामोदर सावरकर हे तरूणांचे लाडके नेते होते. महात्मा गांधी नामदार गोखल्यांना आपले राजकीय गुरू मानीत. महाराष्ट्र हे रचनात्मक कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे ते म्हणत. महाराष्ट्राने त्यांच्या विविध चळवळींना उत्तम प्रतिसाद दिला. याच सुमारास काकासाहेब गाडगीळांच्या आर्जवी प्रयत्नांमुळे केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली बहुजनसमाज कॉंग्रेसमध्ये सामील झाला. भारत छोडो हा निर्वाणीचा इशारा १९४२ साली इंग्रजाना मुंबई येथे देण्यात आला या इशाऱ्याची परिणती पुढे १९४७ साली राजकीय सत्तांतरात झाली. रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि इतर असंख्य राष्ट्रभक्तांनी या शेवटच्या लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बाळासाहेब खेर हे मूळच्या त्रैभाषिक मुंबई इलाख्याचे पहिले महामंत्री होत. मोरारजी देसाई यानी नंतर त्यांची जागा घेतली.

संयुक्त महाराष्ट्र कॉंग्रेसने भाषावर प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले होते. पण १९५६ सालच्या राज्यपुनर्रचना समितीने महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र ते लागू केले नाही आणि येथे गुजराती व मराठी लोकांचे द्वैभाषिक राज्य निर्माण करून मुंबई राजधानी केली. महाराष्ट्रात यावर तीव्र प्रतिक्रिया झाली. केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे एक सर्वपक्षीयांची सभा होऊन ६ फेब्रूवारी १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या समितीला भरघोष यश मिळाले. विधानसभेच्या १३३ पैकी समितीला १०१ जागा मिळाल्या. यात मुंबई शहराच्या १२ जागा होत्या. गुजरात, मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सहकार्याने कॉंग्रेसला मंत्रिमंडळ बनविता आले. या विशाल द्वैभाषिकाचे यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री बनले. एस. एम. जोशी, डांगे, नानासाहेब गोरे, आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र केला. काही लोकांना आत्मबलिदान करावे लागले. पण कॉंग्रेसचे मतपरिवर्तन करण्यात त्यांना शेवटी यश आले. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील चिंतामणराव देशमुखांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला.
१ मे १९६० रोजी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा यांचे `महाराष्ट्र राज्य' निर्माण झाले. मोहोलोश ते महाराष्ट्र ही ऐतिहासिक वाटचाल १९६० मध्ये पूर्ण झाली. आणि मराठी माणसाचे अनंत वर्षांचे स्वप्न साकार झाले. ह्यूएनत्संगने तेराशे वर्षांपूर्वी रेखाटलेल्या प्रतिमेशी नूतन महाराष्ट्राचा तोंडवळा मिळताजुळता आहे.

10 September, 2008

" नांव मराठी, गांव मराठी
जात मराठी, धर्म मराठी

देव मराठी, देश मराठी
त्वेष मराठी, वेश मराठी

प्राण मराठी, शान मराठी
ध्यास मराठी,श्वास मराठी..

महाराष्ट्राला त्रिवार वंदन,
जयजय जयजय, जय मराठी!!!

"... रविराज "




एक मुखाने, एक दिलाने दुमदुमवा संदेश..
गोवा कोकण, व-हाड दख्खन.. एक मराठा देश !!!

जय महाराष्ट्र !!!



राम राम..
मी,रविराज कुलकर्णी.
साधा, सरळ.. "बिचारा" मराठी माणूस...
.एक छोटाच पण जातिवंत रसिक..
मैंफिलीचा बादशहा ..
बसल्या बैठकीला सलग ११ तास गप्पांची मैंफिल मी रंगवली आहे..
मराठी साहित्य, मराठी नाटक, मराठी संस्कृती, आणि मराठी मन यांचा कट्टर पुरस्कर्ता ..
कट्टर मराठी माणूस!!

मला टाळ्या आणि शिट्ट्या मारायला खुप आवडत..
माझा लहान भाऊ मला "सोंगाडया" म्हणतो..
तर मोठा भाऊ म्हणतो "वेताळ"..
"वेताळ".. ज्याच्या गोष्टी आणि किस्से कधी संपतच नाहीत !!

बाकी मग Nothing special....

आपल्याच मस्तीत जगणारा..
काही लोकांना माझ वागण Abnormal वाटत ,
काहींना Extraordinary.

प्रत्तेक जण आपापल्या परीने काय वाटेल ते ठरवतो.

I don't like to give Exaplanations..
Nor I expect it from Anyone.

I know, there is Reason behind Everything, & I believe in Everyone.

बाकी राग, द्वेष, तिरस्कार अशा तुच्छ feelings ना माझ्या मेंदुत बिलकुल जागा नाही.
मातीतला माणूस आहे, आणि मला हे पक्क माहित आहे,
की मला याच मातीत जायच आहे.
मग कुणाचा राग, आणि कसला द्वेष???
लोक का भांडतात तेच कळत नाही मला.
ऊगीचच डोक्यात नसत्या विचारांचा कचरा भरून ठेवतात!!!
माझ्यासाठी तर सगळ जग सुंदर आहे..
मला कसली चिंता नाही, कशाची भिती नाही, कसलाच पश्चाताप नाही..
आणि कुणाचीच पर्वा नाही
.न खंत, ना खेद.. मला कसलच दुखः नाही.
खोट कशाला बोलू उगीच??
आजपर्यंत भरपूर माणस जोडली.
गेली २० वर्ष तेवढच तर करत आलोय.

आणि कागदावराच्या आकड़याना मी marks समजत नाही.
आयुष्याच्या परीक्षेत प्रत्तेक व्यक्ति तुमची चाचणी घेत असतो,
त्यात किती जण मला पास करतात, ते मला महत्वाच वाटत.

दोस्ती केली, तर मग पुन्हा विचार करत नाही..
"माघारी फिरणे नाही!!"
आणि फक्त मैत्रीच्या बाबतीतच नाही, तर overall जगण्यामधेसुद्धा सहसा, मी कधीच माघार घेत नाही.
काय म्हणायचय ते म्हणा, पण आहे अस आहे.
खुप दिलय देवाने मला आजपर्यंत.. अगदी भरभरून दिलय..
माझ्या लायकीपेक्ष्या खरच खुप्प जास्त दिलय..
आता काही मागण नाही, कधीच नव्हत.

फक्त एक इच्छा आहे,...

शेवटचा दिस गोड़ व्हावा!!
बस, अजुन काय हव असत आयुष्यात ???

29 November, 2007

Thats what I am !!!!

I feel like a pheonix at present
I am too eclectic to be considered one type of person.I am the constant contradiction; the loner that's hates to be alone, the hopeful pessimist, the happiest sad women, one mean nice guy, the quietest loudmouth... totally different, that's for sure.

I am a wielder of the spork.I am that random artist.I am water-based enthusiasm.I am a silence,
Lost in the madness
Relying only on art to speak A young artist looking for the light,
Seeking freedom

I am high.I am right.I am not wrong, of course.I am magical! well (or not well) and get along with people in chatsI am very self conscious about how.

I am undead, let me eat your brain.I am a lover and a fighter
I am a figment of your imagination.I am myself!
I am your darkness while you are my light.I am a manager of a chatroom.I am hungry all the time.

I am a penniless fashion designer.
I am a story yet to be written.I am despair, love and kindness.I am your friend, helping you along your way.
I am a boy in a man's body trying to dream less and live more.

I am one who is strong in the mind, but weak in the heart.I am an artist and a dreamer.
I am a crazy artist, future fashion designer and illustrator.

I am the best.I am the worst.
I am just a guy with a pencil and a peace of a paper, a dream
I m no-one - Probably very true.I am me!

I am nonexistent, I am confused, I am not real, I am alone, I am searching, I am a philosopher.I am peace, love, unity, respect, and responsibility.I am in love
I am your smile.I am a sister.I am the love I give.
I am happy for who I am.

I am whatever I strive to be.I am neither a leader nor a follower.I am my own inspiration.I am a self-declared nerd. I am happy! I am my own heroine. I am what I am.

I am not what you wanted me to be.I am not what you expected!I am the best friend no one likesI am...

I am...everything this world has taught me