28 October, 2009
असंच मरा लेको..
राजकारण्याना शिव्या देण ही जगातली सगळ्यात सोपी गोष्ट आहे.
राजकारणी स्वार्थी असतात मान्य आहे, पण ते मुर्ख नक्कीच नसतात.
आणि ते येतात कुठून??? आपल्यातुनच ना? मग त्यांच्या नावाने बोंबलण्यात काय अर्थ आहे ?
राजकारणातील घराणेशाही हा पण फसवा शब्द आहे. घराणेशाही कुठे नसते???
मग त्यांच्या नावाने रडण्यात काय अर्थ आहे??
अहो, पीठाची गिरणी चालवणारा माणूस पण आपली गिरणी आपल्यानंतर आपल्या मुलाकडेच सोपावतो, मग राजकीय वारसा कुणी तरी दुस-याला देइल काय???
तुमच्या घरातलं कुणी राजकारणात काही करू शकलं नाही, ही 'बिचा-या' युवा नेत्यांची चुक असू शकत नाही.
तुमचे वडील, काका, मामा जर राजकारणी असते, तर तुमचे हे मत असले असते का???
जे लोक मुंबई मध्ये दोन-तीनशे लोकांचे बळी गेल्या नंतर सुद्धा मतदानाला बाहेर पडत नाहीत, त्यांच्यासाठी नियतीने असंच मरण लिहिलेलं आहे.
लक्षात ठेवा, गेले ते जात्यात होते, तुम्ही सुपात आहात ..
असंच मरा लेको, तीच तुमची लायकी आहे !!!
.
27 October, 2009
साहेब, काय केलत हे???
कालच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे चक्क लहान मुलानी भाषण पाठ केल्यासारखे बोलले.
प्रश्न काय, उत्तर काय, कशाचा ही कशाला संबंध नाय !!!
"गरज पडल्यास हिंदुत्व" ही नवी व्याख्या, नवी कल्पना भारतीय राजकारणात काल त्यानी आणली।
आणि शिवसेनेचा पराभव झाला नाही म्हणने तर बालिशपणाचे नाही तर वेडगळपणाचे आहे.
"एक ही आमदार निवडून न येण" अशी कदाचित त्यांची पराभवाची कल्पना असेल !!
मराठी माणूस आज पण शिवसेनेच्याच पाठीशी आहे,
कारण शिवसेना ही मराठी मनाची भावनिक गरज आहे..
राज ठाकरे चालवतात ती शिवसेना आहे, मग त्यांच्या पक्षाचं नाव काहीही असो...
राज आज दोन आकड्यात खेळत आहेत, २०१४ ला तीन आकड्यात खेळणार हे नक्की...
मुळात उद्धव ची काहीच चुक नाही, त्यांच्यात पात्रताच नाही तर ते तरी बिचारे काय करणार??? !!!
महाराष्ट्राचे दुर्दैव, दुसरे काय !!! महाराष्ट्रपुरुष ढसढसा रडत असेल आज!!!
खंत फक्त एवढीच आहे, की शेवटच्या काळात बाळासाहेबाना हे दिवस बघावे लागले...
विधानसभेवर भगवा फडकल्यानंतर साहेब दाढी काढणार होते...
.
काळजातली जखम..
काळजातली जखम, अशी कधी कधी भळभळायला लागते..
आपल्या राष्ट्रगीताचा अर्थ लावण्याचा प्रयत्न कधी केला आहेस का तु ???
आपलं दुर्दैव हे, की आपल्याला... आपल्या राष्ट्रगीताचा अर्थच कधी शिकवला जात नाही॥
इंग्रजांचा राजा पंचम जोर्जच्या स्वागतासाठी लिहिलेल्या गाण्यातलं पहिलं कडवं आपण चक्क राष्ट्रगीत म्हणुन स्वीकारलं आहे॥
आता बघ कसा पटापट अर्थ लागतो !!!
"जन-गनाच्या मनाचा अधिनायक असलेल्या हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा)
तुझा जयजयकार असो !!!
पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्रावीड, उत्कल, वंग (हे प्रदेश आणि )
विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा आणि उसळणारे सागर
( थोडक्यात जमीन, पर्वत, नद्या, सागर सर्व )
तव शुभ नामे गाहे, आणि तव शुभ आशिष मागे !!!
आणि वर गाहे तव जय गाथा !!!!
जन-गणासाठी मंगलदायका, हे भारत भाग्यविधात्या (पंचम जोर्जा) जय हे॥ ( तुझा जयजयकार असो !!!)
जय हे, जय हे, जय हे... ( त्रिवार जयजयकार) जय जय जय जय हे !!!!!!( असंख्य वेळा जयजयकार असो !!!)
भारतात आजही करोडो मुले इंग्रजांचा तेंव्हाचा राजा पंचम जोर्जचा दररोज जयजयकार करतात...
अज्ञानात आनंद !!! दुसरं काय म्हणनार ??
आता कसं वाटतय ???
---------------------------------------------------------------------
22 October, 2009
21 October, 2009
22 August, 2009
गीतारहस्याच्या यशापयशाचे रहस्य
जीवनात नैराश्याचे ढग जमू लागले असताना टिळकांनी गीतारहस्य लिहिलं ते पेन्शनरांसाठी नव्हे तर तरुणांसाठी. हा ग्रंथ अलौकिक बुद्धिमत्ता, अचाट स्मरणशक्ती आणि चिकाटीचे उत्तुंग स्मारक आहे. अर्थात गीतारहस्याच्या माध्यमातून टिळकांचं संप्रदायिकरण झालं का असा प्रश्नही उपस्थित होतो.
१९१५च्या जून महिन्यात प्रसिद्ध झालेल्या गीतारहस्याच्या सर्व प्रती संपल्यामुळे लगेच सप्टेंबर महिन्यात पहिले पुनर्मुद्रण करावे लागले. पहिल्या महायुद्धाच्या त्या काळात कागदाची तीव्र टंचाई होती. तरी मुंबईतील ऑपेरा हाऊसजवळील रे पेपर मिलने अगत्याने कागद पुरविला. सध्या पेपर मिल लेन त्याची आठवण मुकाटय़ाने जपते. पुण्यातील तीन छापखान्यात ते छापले गेले. आज ही प्रत हाताळताना ९४ वर्षांपूर्वीच्या टिळकयुगात गेल्याची अनुभूती मिळते. ‘‘मी ज्या शतकात जन्मलो त्या शतकाला भूषण होण्याजोगा ग्रंथ लिहिणार आहे’’ असे आत्मविश्वासाचे उद्गार टिळकांनी आधी काढले होते. ते मंदलेच्या तुरुंगात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संकल्पित गीतारहस्य साडेतीन महिन्यांत हाताने लिहून सार्थ केले. हा ग्रंथ म्हणजे अलौकिक बुद्धिमता, अचाट स्मरणशक्ती, अफाट ज्ञान तसेच भाषाप्रभुत्व, बौद्धिक शिस्त, दृढनिश्चय, चिकाटी, लिहिणाऱ्या हाताची क्षमता वगैरे गुणांचे उत्तुंग स्मारक आहे. टिळकांच्या लोकप्रियतेचा तो उच्चांक होता. तरी काळ प्रतिकूल होत असल्याची वेदनाही प्रस्तावनेत व्यक्त होते.
‘‘कृतान्तकटकाऽमल ध्वज जरा दिसो लागली।
13 August, 2009
दवंडी : पळा रे पळा.. आकाश पडलं !!!
एकदा एका राज्यात एक राजा राज्य करीत होता. (प्रत्येक कथेची सुरुवात अशीच करायची असते.) एकदा त्याचे केस कापताना त्याच्या नाभिकाच्या असे लक्षात आले की, राजाला तीन कान आहेत. त्याला हसू आले. राजाने त्याला दटावले. कोणालाही हे सांगितलेस तर मुंडके उडवीन अशी धमकी दिली. त्या नाभिकाची मोठी पंचाईत झाली. आपल्याला एवढे मोठे रहस्य माहीत आहे आणि आपण ते कुणालाच सांगायचे नाही? बायकोलाही नाही? हैराण झाला तो.. दोन दिवस त्याने कळ काढली, पण मग त्याच्या पोटातच दुखू लागले. शेवटी तो एका जंगलात गेला आणि एका हरणाच्या कानात त्याने ही गोष्ट सांगितली.. राजाला तीन कान.. मन मोकळे झाले. पोटदुखी थांबली. तो परत आला. पुढे कुणी तरी त्या हरणाची शिकार केली. त्याच्या चामडय़ापासून कुणी तरी वाद्य केले. वाद्य वाजवणारा राजाचे मन प्रसन्न करण्यासाठी राजवाडय़ात आला. त्याने वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि त्यातून राजाला तीन कान, राजाला तीन कान असेच बोलू उमटू लागले.
तात्पर्य काय, एखादी गोष्टी कितीही दाबून टाकली तरी ती केव्हा तरी समोर येतेच. कशीही येते, पण आजकाल एवढा काळ थांबायची गरज राहिलेली नाही आणि जंगलात जाऊन हरणाचे कान फुंकायचीही गरज राहिलेली नाहीए. अशी हरणं पावलोपावली भेटतात. आणि त्यांच्या कानात बातम्या सोडणाऱ्या माध्यमांचा तर काय सुकाळूच झालेला आहे.
कुणीतरी म्हटलेलं आहे की, बॅड न्यूज इज अ व्हेरी गुड न्यूज. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही.. माणूस कुत्र्याला चावला तर होते. त्यामुळे सध्या माध्यमांना सुगीचे दिवस आलेले आहेत. स्वाइन फ्लू या रोगाने त्यांचा बातम्यांचा प्रश्न सोडवून टाकलेला आहे. कुणाला माझं बोलणं क्रूरपणाचं वाटेल, पण जरा नीट शांत डोक्याने विचार करा. सगळे डॉक्टर्स ओरडून सांगत आहेत की, स्वाइन फ्लू हा प्रश्नणघातक रोग नाहीए. जे बळी गेले ते एक तर निष्काळजीपणाचे आहेत किंवा त्यांना एकाच वेळी अनेक आजार झाले होते. ज्याचे निदान झाले तर केवळ सहा दिवसांमध्ये माणूस खडखडीत बरा होतो अशा या रोगाला जणू काही प्लेगची साथ आली आहे असे स्वरूप देण्यास माध्यमे कारणीभूत आहेत.
दिल्लीमें स्वाइन फ्लू का एक रोगी मिला.. स्कूलमें लगा ताला.. अहमदाबादमे स्वाइन फ्लूने किया हमला.. एकने गवाँई जान किंवा पुण्यात हाहा:कार.. जनतेत घबराट.. अशा बातम्या देऊन लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण करण्यात येते आहे. होय, आहे. हा आजार आहे. त्याचा प्रसार शिंकांतून, खोकल्यातून होतो. काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे सगळं खरं असलं तरी साप साप म्हणून भुई धोपटण्यासारखा प्रकार होतो आहे. सरकार पातळीवरून पत्रकबाजी करून त्यात आणखी भर टाकली जाते आहे.
मेक्सिकोसारख्या देशाने अत्यंत कमी कालावधीत या रोगाचे जवळपास उच्चाटन केले. सोपी गोष्ट. गर्दी टाळा. सगळी पब्लिक फंक्शन्स बंद करा. शाळा-कॉलेज ऑफिसेस काही काळ बंद करा. सहा दिवसांचे या व्हायरसचे आयुष्य आहे. त्यानंतर तो मरेल. त्यांनी हे केले. आपल्याकडे हे होणार नाही. कारण आपल्याला उत्तरं शोधायची नाहीएत. प्रश्नांचा बागुलबुवा करून त्यावर पोळी भाजून घेण्यात आमच्या लोकांना रस आहे. या रोगावर टॅमी फ्लू नावाची एक गोळी आहे. पण ती म्हणे फक्त सरकारी दवाखान्यातच मिळते. का? का नाही सगळीकडे मिळत? रक्त तपासणी करणाऱ्या लॅब इतक्या कमी का? सरकारी इस्पितळाची परिस्थिती पाहिली तर तिथे लोकांनी येऊन कल्ला करावा असं करण्यामागची मनोवृत्ती आणि गर्दीच्या वेळी नाकाबंदी लावून लोकांचे हाल करणे किंवा तेव्हाच रस्त्याची कामे काढणे यामागची सरकारी मनोवृत्ती एकच आहे. लोकांना त्रास झाला पाहिजे. लोकांनी आपल्याकडे दयेची भीक मागितली पाहिजे. नाही तर मग आम्ही नेते कसे? लोकांचे प्रश्न सुटले तर आपल्याकडे कोण येईल? लोक कायम रंजलेले गांजलेले राहिले तरच या तथाकथित नेत्यांना महत्त्व आहे.
जरा आकडेवारी पाहा. पुण्याची लोकसंख्या साधारण पस्तीस लाख. त्यात रुग्ण ११८. मुंबईची लोकसंख्या किती? दीड कोटी. रुग्ण किती ५५. काय गुणोत्तर प्रमाण आहे? नगण्य. पुण्यामध्ये आणि मुंबईत लाखो लोकांना टीबी झाला असेल. जो जास्त धोकादायक आहे. त्याचाही प्रसार थुंकीतून, श्वासातून होतो. त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. साध्या फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या स्वाइन फ्लूच्या बळीपेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे. सांगणारे कंठशोष करून सांगतात. पण ऐकतो कोण? माध्यमांची ताकद वाईट गोष्टींसाठी वापरली जाते आहे.
जगात कोणत्याही गोष्टीची विक्री ही केवळ भीती या भावनेनेच करता येते. फिअर फॅक्टर महत्त्वाचा, असं केलं नाही तर तसं होईल. की आपण लागलो धावायला. एका सशाच्या पाठीवर झाडाचं पान पडलं तर तो वळूनही न पाहता आकाश पडलं, आकाश पडलं, म्हणून धावत सुटला. समोर दिसेल त्याला सांगत सुटला.. पळा रे पळा.. आकाश पडलं. तसं आपलं झालंय. अत्यंत शांतपणे संघटितपणे याचा मुकाबला आपल्याला सहज करता येईल असं का नाही वाटत आपल्याला? आणि एवढं आपलं काळीज जर सशाचं असेल तर मग खरोखरीची भयग्रस्त करणारी परिस्थिती आली, तर आपण त्याला कसं तोंड देणार आहोत. माध्यमांनी मनोबल वाढवायचं की खच्ची करायचं? याच्याकडे कुणी लक्ष देणार आहे की नाही? का पेपरात आलेली प्रत्येक बातमी आणि टीव्हीवर आलेली प्रत्येक ब्रेकिंग न्यूज ही ‘बाबा वाक्यम प्रमाणम’ म्हणून आपण त्यावर आपलं जीवन अवलंबून ठेवणार आहोत? या सगळ्याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. स्वाइन फ्लू उद्या जाईल, पण त्यातून काही धडा आपण शिकणार आहोत की नाही हा खरा प्रश्न आहे.